Tuesday, February 1, 2011

ताई

नमस्कार !. मी expert कवी नाही पण जे मनातून येतं ते मी लिहितो. आज प्रथमच माझी लाडकी कविता प्रसिद्ध करत आहे. आशा हे तुम्हाला आवडेल.
ही कविता माझ्या लाडक्या ताईच्या लग्नावेळी मनातून आलेली कविता आहे, आजही ही कविता वाचताना कंठ दाटून येतो. तुम्हाला जर बहिण असेल तर नक्कीच ही कविता तुम्हाला आवडेल.

ताई
भातूकलीचा खेळ खेळता खेळता
आज अचानक संसाराच्या गोष्टी बोलू लागली ताई
म्हणे "संसाराचा सागर" मी पोहून जाईन आई.

या संसाराच्या सागराची व्याप्ती माला अजूनतरी कळली नाही,
पण आता ताई "दुसर्‍यांच्या" घरी जाणार हे मन काही केल्या मानत नाही!

मी आईला विचारले, "का ग चालली सासरी आपल्याला सोडून ताई?"
ती म्हणे "बेटा, कधीतरी उमलणारच ना रे जाई-जुई"

"मीच माझ्या बाबांची लाडकी" असं कोण चिडवणार माला आता?
"डोळ्यात तेवढी आसवं आणली" तिनं जाता जाता!

"आता मी एकटाच?" ही कल्पनाच रुचेना,
अन "ताई शिवाय" या कल्पनेने मनाला काही करमेना!

तरी मी केली मनाची तयारी,
ताईला "पाठवायची" तिच्या "त्या" घरी.

ती सुखी राहील याची खात्री "त्याने" दिली
कानपिळित "त्याच्या" कडून मी एवढीच गोष्ट मागितली!

तिचा तो स्वप्नांचा राजकुमार
बघता बघता तिला घेऊन गेला पाहा!
माला तरी आणखी काय हवय?
ताई दिल्या घरी तु सुखी राहा!
-अद्वैत कुलकर्णी

1 comment:

  1. Sir mi RDH!
    mi pan 1 writer ahe.pan adyap 1hi prakashan karu shaklo nahi.
    mi 1 la Atmakathan "MAAZI TAI:Ek Athvan" gatwarshi wayachya 17-18 wya warshi.
    Sir I liked your this poem.I want to contact you.Please visit me on my E-mail: www,rdh@gmail.com
    or meet me on Facebook: www.facebook.com/rdhajare2
    Thank You.

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...